नांदेड। जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपन्न झालेल्या असुन नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच व सदस्य यांनी भविष्यात राजकारण विरहित लोकोपयोगी कामे करावीत असे आवाहन भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी केले आहे.
जिल्हाभरातील नवनिर्वाचित सर्व लोकनियुक्त सरपंच व सदस्य यांचे अभिनंदन करून बालाजी बच्चेवार म्हणाले की, गावपातळीवर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक गावांत स्थानिक विविध राजकीय पक्ष पदाधिकारी एकत्रितपणे येवून निवडणूक लढवतात गावचा सर्वांगीण विकास हाच त्यांचा मुख्य हेतू असतो. परंतु, विजयानंतर बाहेरील अनेक जेष्ठ मंडळी आपल्याच पक्ष विजय झाल्याचे सांगितले जाते. ग्रामपंचायत निवडणूक समर्थक लढवित असतात यासाठी राजकीय चिन्हे नसते असेही स्पष्ट करून ते म्हणाले की, आपल्या जिल्ह्यात विविध गटाचे व पक्षाची लोकनियुक्त सरपंच व सदस्य म्हणून निवडून आले आहेत अनेक गावांमध्ये जनतेने आपल्या बहुमोल मतदानातून एका गटाला लोकनियुक्त सरपंच व दुसऱ्या गटाला बहुमत दिले असले तरी मात्र आता निवडणुका पार पडल्या आहेत.
निवडणूक झाल्यानंतर एकत्रित येवून सरपंच व सदस्य हा संपूर्ण गावाचा कणा असतो याची जाणीव निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी ठेवणे आवश्यक आहे.ग्रामपंचायतच्या माध्यमातून गोरगरीब व गरजू लोकांची प्राधान्याने सेवा करण्याची जबाबदारी नवनियुक्त सरपंचाची आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याची जबाबदारी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची आहे गावातील रस्ते,पिण्याचे पाणी, आरोग्याची व्यवस्था,ड्रेनेज व्यवस्था,स्वच्छता आदी जनतेच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्राधान्याने नवनियुक्त लोकप्रतिनिधीमुळे लक्ष देऊन गावचा विकास करून घेणे अपेक्षित आहे येणाऱ्या काळात आपणच आपल्या भागाचं प्रतिनिधित्व करणार आहात याची जाणीव ठेवून काम करावे असेही पुढे बोलताना भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांना संदेश दिला आहे.