‘आजचा वाचक उद्या चा नेता होणार’ ही मार्गरेट फुलर यांनी सांगितलेली म्हण वाचन करण्याच्या सवयीस प्राधान्य देत त्याचे महत्व पूर्णपणे समजावून सांगणारी आहे. पुस्तकं जीवनातील सगळ्यात चांगले साथी होऊ शकतात. ती ज्ञानाची शक्ती आणि शिकण्याचा पाया आहे. ह्याच कारणास्तव, मुलांनी वाचन करणे आवश्यक आहे. वाचन एका मुलाचा आत्मसन्मान वाढवून देतो व त्यांच्या कल्पना शक्तीस वाव देतो. ह्याने शब्दभांडाराचा योग्य उपयोग आणि शिकण्यास देखील मदत होते. मुलांमध्ये वाचनाच्या सवयी वाढवण्याच्या लाभांबद्दल सांगताहेत मर्लिनवांडच्या लेखिका नेहा जैन.
वाचन मुलांना दुनियेत काय आहे ह्याची तपासणी करण्यास वाव देतं:
वाचन म्हणजे कोणत्याही गोष्टीची सर्व काही माहिती शिकण्याचे द्वार आहे. वाचन लोकं, ठिकाणं आणि घटनांसहित जगाच्या बाबतीत मुलांच्या ज्ञानात भर घालण्यास मदतरूप होते. हे त्यांना नवीन गोष्टी शिकण्यास मदत करतेच पण जीवनातील अकेन क्षेत्रातील ज्ञान विस्तृत करते जे त्यांच्यात आवड निर्माण करते. त्यांना नवे विचार व दृष्टीकोन यांची जाणकारी देते ज्या पासून ते वंचित होते हे मुलांना आपल्या दुनियेच्या व्यतिरिक्त अन्य दुनियेबाबतीत जागरूक होण्यास सक्षम बनवते. निसंदेह हा एक शिकण्याचा सर्वोत्तम उपाय आहे.
वाचन मस्तिष्क साठी एक व्यायाम देखील आहे
वाचन मेंदूस स्वस्थ ठेवण्याचा सर्वात उत्तम उपाय आहे. एक बालक जेव्हढे अधिक मस्तिष्कसाठीचे प्रशिक्षण प्राप्त करेल तेव्हढेच तो चांगले शिकेल. सुचनेच्या मौखिक आणि दृकश्राव्य प्रक्रियेमध्ये मुलांना वाचनासाठी प्रोत्साहित करण्याने, मेंदू जागरूक राहून स्मृतीत सुधार करतो. परिणाम स्वरूप, आपल्या पाल्याला अधिक वाचन करण्यास प्रवृत्त करण्याने, लांबच्या पल्ल्यात त्यांच्यात समज आणि शब्दसंग्रह वाढण्यास मदत होईल.
वाचन सकारात्मकता व आत्मविशवास विकसित करण्यास मदतरूप आहे:
बाल्यावस्थेत वाचन न करता येणारी मुलं आयुष्यात पुढे जाऊन नैरश्यग्रस्त होण्याची संभावना नाकारता येत नाही. त्यामुळे मुलांना एकटेपणा वाटू शकतो, ह्यापायी ती मुलं इतर कार्यक्रमामध्ये भाग घेण्यास कचरतात. ह्याच कारणास्तव, त्यांना नवीन संकल्पना वाचून समजावून सांगणे व त्यासाठी प्रोत्साहित करण्याने सकारात्मकता वाढेल आणि त्यांच्या आत्मसन्मानाच्या बाबतीत विकास होण्यास मदत होईल, जीवनात शिकणे आणि सफलता प्राप्त करणे ह्यास एक भरीव आधार तैयार होईल.
कमी वयातच मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे म्हणजे आयुष्यभर शिक्षण घेण्याची गुरुकिल्ली देणे आहे. वाचनाचा सराव मुलांना नवीन ज्ञान प्रणाली ओळखून अधिक समग्रपणे शिकण्यास मदत करू शकतो, ह्यामुळे मुलांना त्यांच्या वातावरणा बद्दलच नव्हे तर इतर लोकांबद्दल ही समजून घेण्यासआणि सामाजिक-भावनात्मक कौशल्ये समजण्यास आणि अर्थातच कल्पनाशक्ती विकसित होण्यास मदत होते.