श्रीक्षेत्र माळेगाव। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (आझादी का अमृत महोत्सव) तसेच केंद्र सरकारच्या ‘8 वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची’ या विषयांवर अधारीत भव्य बहु-माध्यम प्रदर्शानास आज पासून(23 डिसेंबर) शानदार सुरुवात झाली.
या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषद नांदेडचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या हस्ते झाले. यावेळी गट विकास अधिकारी शैलेश वावळे, सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रविण पाटील चिखलीकर, माळेगावचे सरपंच हनुमंत धूळगुंडे, स्वच्छ भारत अभियानाचे मिलिंद व्यवहारे, केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, इंद्रवदनसिंह झाला, सुमित दोडल आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संदीप माळोदे यांनी आझादी का अमृत महोत्सव व केंद्र सरकारच्या ‘8 वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची’ या बहूमाध्यम प्रदर्शनातून आपल्या स्वातंत्र्य लढ्याची सर्व माहिती तसेच केंद्र सरकारच्या 8 वर्षे कामगिरीची माहिती अत्यंत कमी वेळात आत्मसात करण्यासाठी भाविकांची आवश्य भेट देण्याचे आवाहन केले.
या प्रदर्शनाचे आयोजन भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या, नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरो द्वारे करण्यात आले आहे. या प्रदर्शनात भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील विविध महत्वाच्या घटना-घडामोडी सोबतच 1857 ते 1947 भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान स्वातंत्र्य सेनानी यांची जीवनगाथा व तसेच केंद्र सरकारच्या ‘8 वर्ष सेवाची माहिती बहूमाध्यम स्वरुपात माडण्यात आली आहे. 2500 चौरस फूटावर आयोजित या आकर्षक सजावट बहूमाध्यम प्रदर्शात आझादी क्वेश्ट(भारत के हिरो) आनलाईन खेळ, डिजिटल स्क्रीन, LED वाल्स, विविध स्वातंत्र्य लढ्यातील महान स्वातंत्र्य सेनानिंचे कटाउट्स, सेल्फी बूथ आणि स्वाक्षरी वालच्या माध्यातून अत्यत सोप्या भाषेत माहिती देण्यात आली आहे.
या पाच दिवशीय प्रदर्शनात सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आहे. शाहीर रमेश गीरी यांच्या कलापथकाद्वारे देशभक्तीपर गितांतून प्रबोधन करण्यात येत आहे. हे प्रदर्शन सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्य़त सर्वासांठी मोफत खूले आहे. या प्रदर्शनास यात्रेस भेटी देणाऱ्या सर्व व्यक्तींनी आवश्य प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केंद्र सरकारद्वारे करण्यात आले आहे.