नांदेड। नांदेड पासून जवळच असलेल्या श्री महाशक्ती लिंग मल्लिनाथ देवस्थान मरळक तालुका जिल्हा नांदेड चा 33 वा वार्षिक उत्सव साजरा करण्यात आला. सद्गुरु श्री हवा मल्लिनाथ महाराज यांच्या हस्ते ३३ वर्षांपूर्वी या ठिकाणी देवस्थानाची स्थापना झाली होती. दिनांक रोजी या देवस्थानाचा वार्षिक उत्सव निमित्त व आजादी कi अमृत महोत्सव वर्षानिमित्त जय भारत माता सेवा समिती नवीन दिल्ली शाखा नांदेडच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जय भारत माता सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष सद्गुरु श्री श्री हवा मल्लिनाथ महाराज यांच्या उपस्थितीत श्री गोविंद गुरु गोविंद सिंग जी महाराज यांचे चार साहेब जादे सुपुत्र यांचा वीर बाल दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रथम राष्ट्रध्वज उभारून त्यास मानवंदना देण्यात आली व राष्ट्रगीत घेण्यात आले. चार साहेब जादे यांच्या व गुरुगोविंद सिंग जी महाराज यांच्या प्रतिमेस सद्गुरु श्री श्री हवा मल्लिनाथ महाराज व सचखंड गुरुद्वाराचे कथावाचक श्री न्याहार सिंग जी, श्री रणजीत सिंग कामठेकर, यांनी पुष्पांजली अर्पण केली. त्यांना अभिवादन करण्यात आले. सुरुवातीस जय भारत माता सेवा समितीचे राष्ट्रीय सचिव दासराव हंबर्डे यांनी भारत माता सेवा समितीचे कार्य व उपक्रम याबद्दल माहिती देऊन प्रस्तावना केली.
बसवेश्वर विद्यालय ,कामठाची विद्यार्थिनी कुमारी अंजली कल्याणकर हिने श्री गुरुगोविंद सिंग जी महाराज यांचे चार पुत्रांच्या सनातन धर्म वाचण्यासाठी केलेल्या बलिदानाची विस्तृत माहिती मोठ्या जोशाने व जोमाने सांगितले. त्यानंतर सचखंड गुरुद्वाराचे कथा वाचक श्रीनिहारसिंगजी यांनी सनातन धर्म वाचण्यासाठी व देशासाठी श्री गुरुगोविंद सिंग जी महाराज यांनी केलेल्या त्यागाची व कार्याची माहिती दिली.. तसेच त्यांच्या चार पुत्रांनी देश धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली याची संपूर्ण इतिहास भावी भक्त समोर ठेवला. जो समाज आपल्या पूर्वजांचा इतिहास विसरतो तो समाज मातीमध्ये मिसळतो त्यामुळे आपण आपल्या थोर, बलिदान, त्या ग व देशसेवा केलेल्या थोर पुरुषांची विचार व त्यांनी केलेल्या कार्याचा विसर पडू देऊ नये व त्यातून प्रेरणा घेऊन देशाची सेवा करावी. असे विचार त्यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमास जिंतूर येथील माणिक महाराज रेंगे जनाई अनाथाश्रम यांनी मल्लिनाथ बाबांचे देशा प्रति असलेल्या कार्याची व विचारांचे मांडणी केली. धर्म जात पक्ष पार्टी पेक्षा देश मोठा आहे .देश सुखी तर सर्व सुखी. सर्व काही देशासाठी वेळ प्रसंगी देशासाठी बलिदान द्यावे लागले तरी मागे पुढे पाहू नका व देश सेवा करा. संविधान ने दिलेल्या मताचा अधिकार पैसे घेऊन अथवा देऊन वापर करू नका.. तसेच सदर कार्यक्रमास जय भारत माता सेवा समितीच्या महिला विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तस्मिन पटेल यांनी आपले विचार मांडले. चार साहेब जादे व गुरुगोविंद सिंग जी महाराज यांचे बलिदान सर्वांना प्रेरणा देणारे असून देशावरती प्रेम कसे करायचे याची ज्ञान त्यांच्या त्यागातून बलिदानातून मिळते. देश सर्वश्रेष्ठ आहे याची त्यांनी प्रतिपादन केले.
श्यामजी यांचा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम झाला, शेवटी रणजीत सिंग जी कामठेकर गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव यांनी सद्गुरु श्री श्री हवा मल्लिनाथ महाराज यांना आपल्या कामठा या गावी येण्यास निमंत्रित केले व कार्यक्रमाचे आभार मानले. सदर कार्यक्रमास नांदेड व आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यातून व कर्नाटक राज्यातून हजारो भावी भक्त व देशभक्त उपस्थित होते. सर्वांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. शेवटी कार्यक्रमाची सांगता भारत माता की जय ,वंदे मातरम , मल्लिनाथ महाराज की जय . या या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
सदर यात्रा महोत्सव व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाशक्ती लिंग मल्लिनाथ देवस्थानचे अध्यक्ष दासराव हंबर्डे, उपाध्यक्ष गंगाधर राव कदम, सचिव दामोदर शेट्टी, बालाजीराव कदम, बळीराम कदम, भिवाजी कदम, व्यंकटी कदम, तुकाराम कदम, शिवानंद कदम, मल्लिकार्जुन स्वामी, शेषराव दाल पुसे, जयवंत शिंदे, ज्ञानू दाल पुसे ,गंगाधरराव धुमाळ, साईनाथ भोसीकर, श्रीमती पुष्पलता कापुरे, सुहास नांदेडकर, एडवोकेट संतोष इंगळे, दत्तात्रय कुरुंदे ,जिरोण कर किसनराव पुणेगांवकर , दुलबजी साळकर , प्रभू पाटील, रमेश पाटील, ढोकी, बंडू पाटील, सुधाकर रबडे, शंकर पाटील व अनेक भावी भक्तांनी सेवे. करानी सेवा केली.