नांदेड| आपल्या भारत देशाला विकासात्मकदृष्ट्या मजबूत बनविण्यासाठी अनेक योजना राबवून यामध्ये महिला सबलीकरण, जागतिक उदारीकरण, पोखरण अणु चाचणी असेल, अंत्योदय योजना, सुशासन अशा एक ना अनेक योजना राबवून कठोर तत्त्व वापरुन भारत देश समृद्ध बनविण्यासाठी आखरी श्वासापर्यंत कार्य करुन योगदान देणारे सामाजिक तथा राजकीय महान नेते म्हणजे माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी होत असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले.
ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि. २५ डिसेंबर २०२२ रविवार रोजी सकाळी ठिक १०.३० वाजता हिंदी कवी, पद्मविभूषण भारतरत्न, लोकनेते माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांची ९८ वी जयंती सुशासन दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, त्यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
पुढे बोलताना ते आपल्या भाषणात म्हणाले की, अटल बिहारी वाजपेयी यांनी पायाभूत सुविधा आणि विकासाला गती मिळावी म्हणून अनेक योजना राबवून कार्य केले ते संयुक्त राष्ट्र संघात हिंदीमधून भाषण देणारे पहिले प्रधानमंत्री असून देशात पारदर्शी व जबाबदारीपूर्वक नागरी सेवा देणारे महान नेते होते अशा या विभूतींचा आदर्श घेऊन सर्वांनीच देशासाठी सामाजिक कार्य करण्याची काळाची गरज आहे असेही ते यावेळी म्हणाले.
सर्वप्रथम माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला आगाराचे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक मा. हनमंतराव ठाकूर यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी बसस्थानक प्रमुख मा.श्री. यासीन हमीद खान, कामगार नेते चंद्रकांत कदम पाटील, सहाय्यक वाहतूक निरीक्षक सुधाकर घुमे, विठ्ठल इंगळे, आकाश भिसे, आगार लेखाकार सतीश गुंजकर, वाहतुक नियंत्रक उदय पांडे, सरदार राजेंद्रसिंघ चावला, पाळी प्रमुख संभाजी जोगदंड, राजेंद्र निळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वरिष्ठ लिपीक श्री. नितीन मांजरमकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता केली.
यावेळी आगारातील कर्मचारी संजय खेडकर, कैलास वाघमारे, संदीप देशमुख, कपिल सोनसळे, शिवचरण मळगे, डाखोरे पाटील, सय्यद सरदार, गौतम कांबळे, राहुल राऊत, श्रीमती आशा वाघमारे, सौ. लक्ष्मीबाई पाटोदेकर, श्रीमती सुजाता वाघमारे, मालनबी शेख उस्मान, रमेश आन्येबोईनवाड, राजू घंटे, विनोद हातागळे, दिलीप पिल्ले, आनंद कदम कोंढेकर, मयुर गायकी, सुरेश यशवंतकर, विजय खेडवनकर, शेख अलीमोद्दीन इत्यादी कामगार, कर्मचारी बंधु- भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.