अर्धापूर। काही भामटे पक्ष सोडून गेले आहेत.या भामट्यांना धडा शिकविण्यासाठी आपली निष्ठावंत शिवसैनिकांची सेना तयार आहे.नांदेड जिल्ह्याला शिवसेनेचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. नांदेड जिल्हात शिवसेना क्रमांक एक राहील. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार संघटनात्मक काम सुरू करण्यात आले आहे. शिवसेनेचे लचके तोडण्यासाठी भारतीय जनता पक्ष काम करीत आहेत.त्यांचे मनसुबे उधळून लावले जातील असे प्रतिपादन शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी रविवारी (ता आठ) यांनी केले .
जिल्हा प्रमुख बबनराव बारसे यांच्या मळ्यात नऊ विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पदाधिकाऱ्यांची आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत शिवसेना उपनेत्या प्रा. सुषमा अंधारे यांची आगामी काळातील प्रबोधन यात्रा, खासदार संजय राऊत यांचा दौरा या विषयावर चर्चा झाली.
बैठकीला जिल्हा प्रमुख माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर , माजी आमदार रोहिदास चव्हाण, जिल्हा प्रमुख बबनराव बारसे, माधवराव पावडे, दत्ता पाटील कोकाटे, प्रकाश मारावार, नरहरी वाघ, भूजंग पाटील, नेताजी भोसले, महेश खेडेकर, बालाजी पाटील, महेश पाटील, बंडु खेडकर, पप्पु जाधव, आदी उपस्थित होते.
जिल्हातील पदाधिकार्यांनी संघटनात्मक पातळीवर केलेल्या कामांचा आढावा सादर केला. तसेच येणाऱ्या काळातील प्रत्येक निवडणुकीत शिवसेना सोडुन जाणाऱ्या गद्दारा गद्दारांना धडा शिकविण्यासाठी निर्धार व्यक्त केला.
या आढावा बैठकीला उपशहर प्रमुख पिंटू सुनपे, माजी उपसभापती अशोक कपाटे, तालुका प्रमुख संतोष कल्याणकर, युवा सेनचे दीपक कदम, सदाशिव इंगळे, नागेश सरोळे, महेश बुटले, अशोक डांगे, सचिन इंगोले, संभाजी देशमुख, काजी सल्लाउदिन, शेख रफीक, दत्ता नवले, बाबाराव खंडागळे, नागोराव ढगे, पप्पू राजगोरे, सरपंच कपिल दुधमल, उपसरपंच उद्धव कल्याणकर, दिनेश शिरसागर, चेतन कल्याणकर, शंकर कल्याणकर यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आदि उपस्थित होते.
या बैठकीचे प्रास्ताविक प्रकाश मारावर यांनी केले. यावेळी महेश पाटील, माधव पावडे दत्ता पाटील कोकाटे माजी आमदार रोहिदास चव्हाण, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, बबनराव बारसे, यांनी मनोगत व्यक्त करुन शिंदे गटात गेलेल्या आमदार, खासदारांचा खरपूस समाचार घेतला.
गद्दारांना राजकीय भवितव्य नाही – आष्टीकर
जे शिवसेना सोडुन शिंदे गटात गेलेल्या आमदार खासदारांना राजकीय भवितव्य नाही.यांची लायकी ग्रामपंचायत निवडणुकीत निवडुण येण्याची नाही ते सर्व सामान्य शिवसैनिकांमुळे मोठे झाले आहेत अशा गद्दारांचा जनता करेक्ट कार्यक्रम करतील असे ठामपणे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी सांगितले.