
नांदेड। थंडीची लहर सुरू असताना धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बारावी गंगासागर-जगन्नाथ पुरी यात्रा पूर्ण करून १२२ यात्रेकरूंचे नांदेड येथे सुरक्षित आगमन झाल्याप्रित्यर्थ नांदेड रेल्वे स्थानकावर सोमवारी रात्री ढोलताशांच्या गजरात,पुष्पवृष्टी करत भव्य स्वागत करण्यात आले.


सारे तीरथ बार बार, गंगासागर एक बार या प्रचलित उक्ती प्रमाणे पूर्वी अत्यन्त कठीण वाटणारी गंगासागर यात्रा आता बऱ्याच सुविधा झाल्यामुळे सुलभ झाली.कोरोना मुळे दोन वर्ष खंड पडल्यानंतर या वेळेस मोठ्या उत्साहात ही यात्रा सुरु झाली.पहिल्या टप्प्यात दिलीप ठाकूर यांच्या समवेत नांदेडसह मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, संभाजीनगर, परभणी, लातूर व हैद्राबाद येथील १११ यात्रेकरू व ४ टूर मॅनेजर आणि ७ कॅटरिंग टीमचे सदस्य सहभागी झाले होते.ईशान्यामध्ये प्रचंड धुके पडल्यामुळे यात्रेकरूंना रेल्वे प्रवासाला वेळ लागला.आठ दिवसाच्या कालावधीत रेल्वे, बस,बोट,नाव,छोट्या बॅटरीरिक्षाचा वापर करून यात्रेकरुंनी गंगासागर येथे पवित्र स्नान केल्यानंतर कपिलमुनीचे दर्शन घेतले. कोलकाता येथे कालिमाता, बेलूर मठ, दक्षिणेश्वर मंदिर, विक्टोरिया मेमोरियल या प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या.


चारोधाम पैकी एक असलेले जगन्नाथपुरी चे दोनदा दर्शन घेतले.पुरी येथे रेतीपासून बनविण्यात आलेली आकर्षक शिल्प संग्रालय पाहिले. पुरीचचे गोल्डन बीच व चंद्रभागा बीच येथे स्पीड बोट,उंट व घोडा सफारी,एटीव्ही बाईक राईड चा आनंद घेतला.कोणार्क येथील जगप्रसिद्ध सूर्य मंदिराला भेट दिली. नरेंद्रभाई मोदी यांच्या भेटीमुळे आणखी जास्त प्रकाशजोतात आलेले भुवनेश्वर येथील लिंगराज मंदिराचे प्रचंड गर्दीत दर्शन घेतले. वातानुकूलीत तृतीय वर्गाचा रेल्वे प्रवास, प्रशस्त तीन बसेस आणि राहण्यासाठी उत्तम हॉटेल मध्ये सुसज्ज रूम मध्ये यात्रेकरूंची व्यवस्था करण्यात आली होती.


दिलीप ठाकूर यांनी वेळोवेळी घेतलेले मनोरंजक खेळ, अंताक्षरी,प्रत्येक प्रवाश्यांवर केलेले मार्मिक विनोद यामुळे प्रवासाची रंगत वाढली.ठाणे येथील कॅटरिंग टीमने रुचकर महाराष्ट्रीयन भोजन वेळेवर दिल्यामुळे सर्वांची प्रकृती चांगली राहिली.संदीप मैंद, किरण मोरे यांनी योग्य नियोजन केले. प्रवासादरम्यान विशाल मुळे, संजय राठोड, लक्ष्मीकांत जोगदंडे यांनी सर्वांची वैयक्तिक काळजी घेतली.सुखरूप आलेल्या यात्रेकरूंचे नांदेड रेल्वे स्थानकावर ढोल ताश्याच्या गजरात पुषवृष्टी करत जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यावेळी नांदेड रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाल्यामुळे जत्रेचे स्वरूप आले होते. भाऊ ट्रॅव्हल्स व माय हॉलिडेज च्या वतीने तीस जानेवारीला केरळ टूर,सतरा फेब्रुवारीला अयोध्या काशी, नऊ मार्चला नेपाळ, सत्तावीस मार्चला रामेश्वर कन्याकुमारी,पाच एप्रिलला हिमाचल प्रदेश, सविस एप्रिलला उज्जैन ओमकारेश्वरला रेल्वेने यात्रा जाणार असल्याची माहिती दिलीप ठाकूर यांनी दिली.प्रतिकूल परिस्थितीत देखील दिलीप ठाकूर व त्यांच्या टीमने अंत्यत नियोजनबद्ध व्यवस्था केल्याबद्दल सर्व यात्रेकरुंनी समाधान व्यक्त केले
