हिमायतनगर। येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सवा अंतर्गत राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा व स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी करण्यात आली.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम ह्या लाभल्या होत्या. तर मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. वसंत कदम आणि इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. प्रवीण सावंत हे मार्गदर्शक म्हणून लाभले होते.*_
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व जिजाऊ वंदने नंतर मंचावरील मान्यवरांचे करण्यात आले. तदनंतर महाविद्यालयाचा बी. ए. तृतीय वर्षाचा विद्यार्थी निलेश चटणे, कु. वैष्णवी वडटवाड व कु. वैशाली झूकरे आदीं विद्यार्थांनी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचे ओजस्वी व तेजस्वी चरित्र आपल्या मनोगतातून मांडले.
प्रमूख पाहुणे म्हणून मंचावरून बोलताना प्रा. डॉ. वसंत कदम यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित काही ठळक व अभ्यास पुर्ण माहिती देताना सांगितले की राष्ट्रमाता जिजाऊ ह्या कष्टाळू, प्रेमळ व प्रसंगी अतिशय कठोर होत्या तसेच ते पुढे म्हणाले की, जगातील राजकीय कर्तबगार महिलांचा अभ्यास केला असता. राष्ट्रमाता जिजाऊ सारखा त्याग, समर्पण व स्वाभिमान जगातील दुसऱ्या महिलांमध्ये मला दिसला नाही. आपल्या बाळ शिवबाला सत्य, प्रामाणिकता, धर्मनिरपेक्षता, आत्मनिर्भरता आदी मूल्यांची रुजण करतांना प्रसंगी शत्रूला ही मदत करणारा रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला दिला. आर्याअर्थाने तोच रयतेचा राजा ठरला. आशा मातेचे रुण फेडण्यासाठी आज आम्ही पुढे आले पाहिजे. आशा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
तसेच मंचावर उपस्थित असलेले दुसरे प्रमुख पाहुणे प्रा. प्रविण सावंत यांनी राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या जीवन, कार्यावर व तत्वज्ञानावर प्रकाश टाकताना ते म्हणाले की, स्वामी विवेकानंद हे शिकागो येथील केवळ धर्म परिषदेला धार्मिक दृष्टीकोनातून उपस्थित होते असे नाही, तर त्यांनी हिंदू धर्मातील तत्वज्ञानाचा जागतिक तंत्रज्ञानाशी मेळ घालून हिंदू धर्माची प्रगती साधने व देशातील युवकांना नविन तंत्रज्ञानाच्या विचारावर जाण्याचा मार्ग दाखविण्याचा विचार त्यांनी मांडला.
तसेच देशातील नागरिकांना धार्मिक संहिष्णु विचारासह आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास देशाचा विकास होईल. यावर त्यांचा ठाम विश्वास होता. म्हणून त्यांनी युवकांना आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत कुठल्या ही सबबीवर न थांबण्याचा मोलाचा संदेश दिला. त्यांचा बौद्ध तत्त्वज्ञानावर सुध्दा सखोल अभ्यास होता. आशा नाविन्यपूर्ण विचारांची मेजवानी त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना दिली. व शेवटी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपातून आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनो जागृत व्हा! राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचाराची कास धरून आपल्या जीवनात यश प्राप्त करा. असा मोलाचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
या कार्यक्रमाचे सुंदर असे आयोजन नियोजन व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. शिवाजी भदरगे यांनी केले. तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. सविता बोंढारे यांनी मानले.
या संयुक्त जयंती सोहळ्याला महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी प्रा. डॉ. डी. के. कदम, रासेयोचे सहकार्यक्रम अधिकारी डॉ. एल. बी. डोंगरे, क्रीडा संचालक डॉ दिलिप माने, डॉ. एल. एस. पवार, डॉ. डी. सी. देशमुख, डॉ. कृष्णानंद पाटील, प्रा. मुकेश यादव, प्रा. राजू बोंबले, प्रा. मुपडे, प्रा. हाके, प्रा. निखाते आदी सहकारी प्राध्यापकांसह महाविद्यालयाचे कार्यालयीन कर्मचारी व तसेच मोठ्या संख्येने राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वंयसेवक स्वंयसेविका व तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.