अर्धापूर,नीळकंठ मदने। तालुक्यात कडाक्याची थंडी पडत आहे,त्यातच भर कालव्याला इसापूर धरणाचे पाणी सुटले आहे, सर्वत्र केळी,ऊस,हाळद,गहू, हरभरा, ज्वारी पीकांना सिंचना केल्यामुळे आणखीनच थंडीत भर पडला असून, सकाळी व रात्रीला चोकाचोकात एकच म्हणत आहेत,आला ऐन थंडीचा महिना झटपट शकोटी पेटवा…याची सर्वत्र चर्चा आहे, त्यामुळे युवकासह वयोवृद्ध शेकोटी चा आधार घेत आहेत.
नांदेड जिल्हा थंडीने गारठला,त्यातच अर्धापूर तालुका शंभर टक्के बागायतीसाठी प्रसिद्ध असल्याने उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या पाण्याचे प्रवर्तन सुटल्याने व शेतकऱ्यांनी शेतातील सर्व पीकांना सिंचन केल्याने आणखी थंडीत कमालीची विक्रमी वृध्दी झाल्याने दमा असलेल्या व वयोवृद्ध व्यक्तींना थंडीमुळे जीवाला धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे तालुका प्रशासनाने गर्दी देणारे कपडे घालून वयोवृद्ध व्यक्तींनी पाण्यात जाऊ नये व थंडीपासून आपापला बचाव करावा असे आवाहन केले आहे.
सर्वत्र शकोटीच शकोटी दिसत असून वाहन चालकही शकोटीचा आधार घेत आहेत, थंडीच्या वातावरणात अचानक चहा ला मागणी वाढल्याने चहाचे दर वाढले आहेत,गरम गरम फराळाच्या पदार्थांची मागणी होत आहे,तर मफलर, जॅकेट,हातमोजे या कपाड्यांची छोट्या-मोठ्या वयोगटातील व्यक्तीं मोठ्या प्रमाणावर खरेदी करीत आहेत.
सर्वत्र गॅसवर स्वयंपाकासह पाणी गरम करण्याचे काम चालते,पण आता शकोटीसाठी लाकडाला फार महत्त्व प्राप्त झाले आहे, त्यामुळे सरपण (जळतण) गोळा करतांना गावागावातील नागरिक दिवस आहेत,आणखी किती दिवस कडाक्याची थंडी राहणार आहे याची जोरात चर्चा सुरू आहे.