नांदेड| राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात गुणवान, गुणवंत विद्यार्थी घडतात. हे शिबिर म्हणजे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाचा केंद्र होय, असे प्रतिपादन उदयगिरी महाविद्यालयाचे डॉ. गौरव जेवळीकर यांनी आज येथे केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास विशेष शिबिर आयोजन करण्यात आले होते. त्या समारोपप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव कृष्णा भैया शिवाजीराव दळणर यांची उपस्थिती होती.
तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे अधिसभेचे सदस्य डॉ संतराम मुंडे, शालेय समितीचे अध्यक्ष रामेश्वर बोनर, मुख्याध्यापक देविदास राठोड, ज्ञानोबा कुंडगीर, मुख्याध्यापक शारदा मोटे,प्राचार्य विठ्ठल डुमनर,भक्तराज कुंडगीर, सदाशिव कुंडगीर आदींची उपस्थिती होती. मान्यवरांच्या सत्कारा पूर्वी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, अहिल्यादेवी होळकर, स्वामी विवेकानंद, प्राचार्य शिवाजी दळणर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बोथी गावातील स्वंयसेवक दामोदर बोनर, शोभाताई सोडगीर यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर डॉ. जेवळीकर म्हणाले,” राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे समाज आणि महाविद्यालय यांना जोडणारा दुवा होय. तसेच ज्ञान आणि श्रमदानाचे महत्त्व शिबिरातून शिकायला मिळते. विद्यार्थ्यांवर संस्कार आणि समाजातील वातावरण माहीत होण्यासाठी अशा शिबिराचे आयोजन केले जाते. त्यांचा फायदा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना होतो. यातून अनेक विद्यार्थी घडतात. महापुरुषांचे आत्मचरित्र वाचल्यानंतर जगण्याची उमेद वाढते. उंची गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न आणि अभ्यास केला पाहिजे. मैदानाची जागा मोबाईल, टीव्ही, लुडो, गेमने घेतली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्र हे खिळ खिळ झाल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्र निर्मितीसाठी वाचन आणि मैदानी खेळ खेळले पाहिजे. शिबिरातील विद्यार्थी हा गुणवान असतो. दागिन्यापेक्षा पुस्तकावरून श्रीमंती कळाली पाहिजे, असे ही त्यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. वसंत सरवदे यांनी केले तर सूत्रसंचलन डॉ. तुकाराम बोबडे यांनी केले. आभार कार्यक्रम अधिकारी डॉ. विश्वनाथ रासवे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ उत्तम देवकते, डॉ रेणुकादास बोनर, डॉ. बालाजी शिंदे, दामोदर बोन्नर, डॉ.अंगद गडमे, डॉ श्रीहरी चव्हाण, प्रा उद्धव होनमाने,प्रा.दुलेखन पठाण, डॉ विजयकुमार सोन्नर, डॉ. दिपाली पांडे, डॉ. सारिका केदार, डॉ सिंधुताई खंदारे, तायवडे, प्रा शंकर घाडगे आदींनी केले आहे. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक मोठ्या संख्येने हजर होते.