हिमायतनगर, अनिल मादसवार| स्वामी रामदेव बाबा यांनी आस्थाच्या माध्यमातून जगभर योगाचा प्रसार केला आहे. कोरोनाच्या महाभयंकर संकट काळामध्ये योग साधनेला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. योगामुळेच आपण सर्वजण कोरोनाचा महामुकाबला केला आहे. त्यामुळे आता संपूर्ण भारत देशात योगाचे महत्त्व पटू लागले आहे. नुसते महत्व पटून चालणार नाहीतर यात वाढ व्हावी म्हणून ग्रामीण भागात योगाचे महत्त्व प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. योगामुळे प्रत्येक नागरिकाचे शरीर निरोगी व सुदृढ राहण्यास मदत होते. योगाचे ज्ञान आपण आत्मसात केल्यांनतर आपल्या लहान मुलाबाळांना आणि परिसरातील नागरिकांना देणं गरजेचे आहे. तरच आपला भारत निरोगी होईल असे प्रतिपादन योगी श्याम भारती महाराज यांनी केले.
ते योग प्रचार, योग विस्तार, योग शिबीर, योग शिक्षक प्रशिक्षण, वेलनेस उपचार, विषमुक्त शेतीचा उद्देश घराघरात पोचविण्यासाठी आणि संपूर्ण भारत रोगमुक्त करण्यासाठी पतंजली योगपीठ हरिद्वार तर्फे हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर सभागृहात आयोजीत करण्यात आलेल्या नांदेड जिल्ह्यातील ५ तालुक्यातील योग प्रशिक्षक व साधकांची बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
दि.१६ सोमवारी सकाळी ११ वाजता घेण्यात आलेली बैठक माहूरचे योगी श्याम भारती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत तर भारत स्वाभिमानी ट्रस्ट महाराष्ट्राचे राज्य प्रभारी दिनेश राठोड, पतंजली किसान सेवा समिती महाराष्ट्राचे राज्य प्रभारी श्री दत्तात्रेय काळे, युवा भारतचे राज्य प्रभारी शंकरजी नागापुरे, भारत स्वाभिमानी ट्रस्टचे सह राज्यप्रभारी अनिलजी अमृतवार, भारत स्वाभिमानी ट्रस्टचे राज्य कार्यकारिणी सदस्य पंढरीनाथ कंठेवाड, नांदेडचे जिल्हा प्रभारी राम शिवनपोर, जिल्हा प्रभारी सुरेश लंगडापुरे, सह प्रभारी शिवाजी शिंदे, यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा व तालुकास्तरीय विषेश बैठक संपन्न झाली. राज्याचे प्रभारी सर्वच सदस्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि आगामी काळात जास्तीत जास्त शिबिरे घेऊन गावागावात योगाचा प्रचार प्रसार झाला पाहिजे योगाचे महत्त्व समाजाला कळावे यासाठी सर्वानी प्रयत्न करावे असे आवाहन करण्यात आले.
बैठकीच्या सुरुवातील प्रभू श्रीरामचंद्राच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्रार्थना झाली, बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे हिमायतनगर येथील पतंजली योग समितीच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला. अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन करून आगामी काळात योगाचा विस्तार प्रचार आणि प्रसार करून घराघरात योग कसा पोचेल यासाठी कश्या पद्धतीने प्रयत्न केले पाहिजे. ठिकठिकाणी योग शिबिरे घेऊन भावी पिढी आणि भारत देश कसा रोगमुक्त झाली पाहिजे. स्वामी रामदेव बाबा यांच्या योगाचा सर्वांना कसा लाभ मिळेल यासाठी सर्वानी प्रयत्न करून नियमित योग वर्ग सुरु ठेवणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी नागनाथ अक्कलवाड, गणेश कदम, रामराव सूर्यवंशी, वऱ्हाडे सर, बालाजी बलपेलवाड, गजानन चायल, नाथा गंगुलवार, गौतम हनवते, प्रभाकर पळशीकर, रेणुकादास बेहरे, प्रकाश भुसारे, संतोष पळशीकर, मारोतराव लुम्दे, शैलेंद्र नावडे, श्यामराव कदम, गोपाळ नप्ते, साहेबराव अष्टकर, राजू चार्लेवाड, किशन विठ्ठलवाड, मल्लिकार्जुन अप्पा, बाबुराव सूर्यवंशी, प्रभाकर सोनटके, कुलदीप राऊत, आदींसह हिमायतनगर, हदगाव, भोकर, माहूर तालुक्यातील योग प्रमुख साधक, प्रशिक्षक व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.