
नांदेड। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद द्वारा पुरस्कृत विकासार्थ विद्यार्थी ह्या आयाम अंतर्गत माघ शुध्द दशमी ह्या दिवशी गोदावरी नदीचा अवतरन दिन साजरा करण्यात आला, हा उपक्रम अभाविप २०१७ पासुन राबवत आहे ह्याचा प्रसार व प्रचार जनमानसात व युवा पिढी पर्यत पोहचावा व नदी हि आपली जीवन दायीनी असुन तिचे संरक्षण व संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे हा त्यामागील उद्देश आहे

गोदावरी अवतरन दिनाच्या पुर्व संध्येला प्रमुख मान्यवर म्हणुन गंगाविचार मंच चे राष्ट्रिय संयोजक श्री भरत जी पाठक हे उपस्थित होते ह्यावेळी त्यांनी नही रूकेंगे स्वच्छ करेंगे असा नारा देते नमामी गंगे प्रमाणे सर्व नद्यांचे अस्तित्त्व अबाधित राखणे व त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे असे सांगितले. ह्या वेळी नमामी गंगे ह्या उपक्रमात गोदावरी नदीचाही समावेश करावा असे निवेदन श्री भरतजी पाठक ह्यांना समस्त नांदेड वासींयांच्या वतीने देण्यात आले.

ह्यावेळी कार्यक्रमाचा मुळ उद्देशाला अनुरूप असे संरक्षण व संवर्धन हा विचार कृतीशीलतेतुन मनामनात रूजविण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यानुसार सर्व माता भगिनी च्या हस्ते गौमय दीप दान करण्यात आले व ओटीचे सामान गोदावरी नदीत अर्पण न करता ते प्रतिकात्मक स्वरूपात प्रतिमे पुढे सर्व ओटी भरली ,ओटीतील ही सामग्री गरजू लोकांना देण्यात येणार आहे . तर ह्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून विकासार्थ विद्यार्थी (SFD) राष्ट्रीय सहसंयोजक मयुर जव्हेरी हे उपस्थित होते.

ह्या कार्यक्रमाचे सुञसंचलन सौ योजना कौलवार ह्यांनी केले तर कार्रयक्रम यशस्वितेसाठी सनतकुमार महाजन , गणेश बोडके , सर्वेश पिंपराळे , श्रीराज चक्रावार ,अंकिता कामतीकर ,सतीश भोळे , शुभम मोहरे , राजु नरवाडे , वैष्णव मोतीवाड , मोहन मोरे , यांनी परिश्रम घेतले.

