अर्धापूर। राज्यात खोके व सर्वच ओके चे वातावरण सर्वत्र दिसत असून, निष्ठावंत कधीही विकत नाहीत, त्यामुळे कार्यकर्त्यांनो खोके देणारांचे जास्त काळ चालणार नाही,उध्दव ठाकरे यांचे व माझे संबंध चांगले आहेत,राज्यात आगामी निवडणुक महाविकास आघाडी एकत्र लढणार असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले.
अर्धापूरात शहराध्यक्ष राजेश्वर शेटे व अनिल शिरसाठ यांनी रुद्र पेट्रोल पंपाचा उद्घाटन सोहळा आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आ.अशोकराव चव्हाण ही ते,तर माजी मंत्री डि पी सावंत,आ.मोहनराव हंबर्डे,सोबित सोनी, जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, चेअरमन गणपतराव तिडके, नरेंद्र चव्हाण,सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, किशोर स्वामी, बबनराव बारसे, तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे, पप्पू पाटील कोंढेकर, छत्रपती कानोडे,अ.गफ्फार,विजय गोयल, अजिंक्य पाटील,व्यंकटराव कल्याणकर, बालाजी पंडागळे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पाहुण्यांचा सत्कार व्यंकटेश शेटे व डॉ अनिल शिरसाठ यांनी केला.यावेळी अशोकराव चव्हाण म्हणाले कि,माझा उल्लेख परीस म्हणून केला पण धोकेबाजाला वेळप्रसंगी लोखंड व्हावे लागते, निष्ठावंत कार्यकर्ते हीच माझी खरी ताकत आहे, प्रत्येकाने जोडधंदा करावा,उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या पाणी भोकर मतदार संघात आणून आता शुध्द पाणी पुरवठा योजना यशस्वी करु,अनेक ठिकाणी रस्ते झाले,विकासकामे यापुढेही चालूच राहतील असे ते म्हणाले.
डि पी सावंत म्हणाले कि, युवकांनी व्यवसायाकडे वळावे, मोठ्या संधी कर्तबगार युवकांची वाट पाहत असतात,कुणावर अवलंबून राहू नका,स्वावलंबी व्हा असे ते म्हणाले. प्रस्ताविकात राजेश्वर शेटे यांनी कार्यक्रमाची रुपरेषा सांगून नेते कार्यकर्त्यांना कशी मदत करु शकतात याचा अनुभव विषद केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जिल्हा सचिव निळकंठराव मदने यांनी तर आभार डॉ जयश्री अनिल शिरसाठ यांनी केले.
याप्रसंगी डॉ शिवाजी वाडेकर, नासेरखान पठाण,आनंद भंडारे, उतमराव लोमटे,प्रवीण देशमुख,राजू बारसे,व्यंकटी राऊत,आर आर देशमुख,राजू कल्याणकर,डॉ उतम इंगळे, बाळू पाटील,पंडीत लंगडे,ओंमकार वटमे, नगरसेविका शालिनी शेटे,डॉ पल्लवी लंगडे,काजी सल्लाऊद्दीन, सोनाजी सरोदे,अमोल डोंगरे,मुसव्विर खतीब,बळवंत इंगोले, संजय लोणे,सुनिल अटकोरे,गाजी काजी,काळे, राजाराम राजेवार,डॉ विशाल लंगडे,मोतीराम जगताप, डॉ बालाजी पेनूरकर,अशोक सावंत,सुभाष कल्याणकर, ज्ञानेश्वर शेटे,पंडीत शेटे, शंकरराव ढगे, चंद्रमुनी लोणे, राजाराम पवार,यावेळी सरपंच, चेअरमन, पदाधिकारी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.