Sunday, April 2, 2023
Home कृषी अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी – NNL

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी – NNL

पांडुरंग शिंदे (युवा प्रदेशाध्यक्ष, रयत क्रांती संघटना)

by nandednewslive
0 comment

नांदेड| राज्यात अवकाळी पावसाने शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. अवकाळी पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, मका पिकाचं नुकसान झाले आहे. केळी पिकाचे मोठे नुकसान झाले असून बागाच्या बागा जमीनदोस्त झाल्यात आहेत. झालेले नुकसान भरपाई होणे अशक्य आहे.

शेतकऱ्याच्या डोळ्यांमध्ये आसू वाहत आहेत. एकीकडे पिकाला योग्य भाव नाही ,दुसरीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे कंबरडे मोडलेले आहे ,अशा दुहेरी संकटात सापडलेल्या बळीराजाला सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी. राज्यामध्ये कर्मचाऱ्यांचा संप चालू असल्यामुळे पंचनाम्यामध्ये वेळ न घालवता सॅटेलाईटच्या माध्यमातून नुकसानग्रस्त जिल्ह्यामध्ये सरसकट शेतकऱ्यांना सरकारने मदत जाहीर करावी व शेतकऱ्याला आधार देण्याचे काम करावे.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!