
हिमायतनगर। तालुक्यातील मौजे दरेसरसम, पवना, वाशी या रस्त्याचा गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न आ. माधवराव पाटील जवळगाकर यांच्या प्रयत्नांमुळे मार्गी लागला असून, यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जवळपास दहा कोटी पन्नास लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याच्या कामाची प्रशासकीय मान्यता देखील मिळाली असून, लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष दादा राठोड यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली आहे.

हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. हदगाव हिमायतनगर मतदार संघाचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागातील रस्ते, पुलाची कामे मार्गी लागत आहे. त्यामुळे ग्रामीण रस्ते मुख्य रस्त्याला जोडण्यात यश येत असल्याचे सुरू असलेल्या विविध कामावरून दिसून येते आहे. यामुळे दळणवळणाचा होणारा त्रास दुर होत असल्याची भावना जनतेच्या माध्यमातून व्यक्त केली जाते आहे. सरसम आबादी ते पवना दरेसरसम, वाशी जाणारा हा मार्ग कमी अंतराचा मुख मार्ग आहे.

भोकर-हिमायतनगर या राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने पवना परिसरातून रस्त्यासाठी गौण खनिज आल्यामुळे हा रस्ता अत्यंत खराब होऊन रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असल्याने या भागातील शेतकरी, वाहनधारकांना, नागरिकाना जीवघेणा परिस्थितीतुन ये-जा करावी लागत होती. या रस्त्याची मागणी लक्षात घेऊन रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्यांनी या रस्त्यासाठी पाठपुरावा केला. आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जवळपास दहा कोटी पन्नास लाख रुपये निधी मंजूर करून आणला आहे. या रस्ता कामाची प्रशासकीय मान्यता देखील मिळाली आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ता मंजूर केल्याने या भागातील पवना, वाशी, दरेसरसम येथील सरपंच नागरीकांनी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष दादा राठोड, सुभाष बलपेलवाड, सचिन राठोड, परमेश्वर जाधव, बाळू मुरगुलवाड, शेख फकिर, जयवंत जाधव, यांच्यासह या भागातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी, नागरीक व जनतेतून आभार मानले जात आहेत.

