Tuesday, June 6, 2023
Home राजकीय तेलंगणाला विकास शक्य तर महाराष्ट्राला का नाही – मुख्यमंत्री केसीआर यांचा सवाल -NNL

तेलंगणाला विकास शक्य तर महाराष्ट्राला का नाही – मुख्यमंत्री केसीआर यांचा सवाल -NNL

शेतकऱ्यांना एकरी 10 हजार, मोफत वीज दिल्यास महाराष्ट्रात येणार नाही- के. चंद्रशेखर राव

by nandednewslive
0 comment

नांदेड। तेलंगणा निर्मिती होवून अवघे आठ वर्षे पुर्ण होत आहेत. राज्य निर्मितीपुर्वी तेलंगणातील परिस्थित चांगली नव्हती. मात्र आमचे सरकार येताच कमी वेळेत एकापेक्षा एक लोकहिताच्या कल्याणकारी योजना राबवून विकासामध्ये इतर राज्यांच्या तूलनेत तेलंगणाने सर्वाधिक प्रगती साधली आहे. जे तेलंगणाला जमले ते महाराष्ट्राला का जमत नाही. असा सवाल तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी केला.

ते नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे दि.२६ रोजी बीआरएस पक्षाची जाहिर सभा व पक्षप्रवेश सोहळा प्रसंगी सभेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी लोहा, कंधार मतदार संघाचे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्यासह अनेकांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. यावेळी पुढे बोलताना केसीआर म्हणाले की, निसर्गाने आपल्याला गरजेपेक्षा जास्त दिले आहे. राज्यात भरपुर पाण्याचा स्त्रोत आपल्याकडे आहे. मात्र या पाण्याचे योग्य नियोजन येथील राज्यकर्त्याना करता येत नसल्याने सर्व पाणी समुद्रात वाया जात आहे. सव्वाशे वर्षे चोविस तास देशात विजपुरवठा होवू शकतो एवढा कोळसा साठा असताना वीज दिली जात नाही. मात्र तेलंगणात चोविस तास विज दिल्या जाते. शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी विनाअट पाहिजे तेवढी मोफत वीज दिल्या जाते.

पुढे केसीआर म्हणाले महाराष्ट्र सरकारने सभा काय घेतली आणि राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपये अर्थिक मदतीची घोषणा केली. मात्र ही तूटपुंजी मदत म्हणजे शेतकऱ्यांना दिली जाते आहे. आपल्याला भीक दिल्या असल्यासारखी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळे शेतकरी राजा आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरत असतील तर आमदार, खासदार काय करत आहेत. ते फक्त गुवाहटीला पळून जाण्यासाठीच का..? असा टोलाही केसीआर यांनी यावेळी राज्य सरकावर लगावला.

पुढे ते म्हणाले की, निवडणूका आल्या की केवळ जनतेला खोट्या अश्वासनाची भुल दिल्या जाते, मात्र यापुढे कोणालाही भीक मागण्याची गरज पडणार नाही. आपल्यातीलच आमदार, खासदार तयार करून विकास केल्या जाईल. त्यामुळे सर्वांनी एकत्र आले पाहिजे. तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका ही बीआरएस पक्ष पुर्ण ताकदीने लढविणार आहे, असे त्यांनी जाहीर केले. यावेळी एकच जयघोष झाला अगली बार किसान सरकार…..

के. चंद्रशेखर राव म्हणाले की, तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्रात सोयी-सुविधा द्या. आम्हाला वारंवार येण्याची गरज पडणार नाही. जोपर्यंत तुम्ही शेतकरी, दलितांचे प्रश्न सोडवणार नाहीत तोपर्यंत मी महाराष्ट्रात येणार. या देशावर ५४ वर्ष काँग्रेसने व १६ वर्षे भाजपने राज्य केले. या दोन्ही पक्षांत कोणताही फरक नाही. काँग्रेसमधून भाजपत गेलेल्यांना मंत्रिपद मिळाले, जनतेला काय मिळाले? असा प्रश्न राव यांनी केला. 

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!