Sunday, May 28, 2023
Home खास न्यूज वाॅटरबेल उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद -NNL

वाॅटरबेल उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद -NNL

by nandednewslive
0 comment

नांदेड| शालेय विद्यार्थ्यांनी दररोज पुरेसे पाणी प्यावे, या उद्देशाने राज्याच्या शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये तीन वेळा ‘वॉटर बेल’ (पाणी पिण्याची घंटा) वाजविण्याचा अध्यादेश काढला होता. केरळ येथील एका शाळेने राबविलेला ‘वॉटर बेल’चा उपक्रम केरळ राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविला. त्याचे चांगले परिणाम दिसून आल्याने महाराष्ट्रातील शाळांमध्ये सुद्धा वॉटर बेल व्हावी, अशी मागणी समोर आली होती.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा अध्यादेश प्रसिध्द केला. मात्र कोरोना काळामुळे या अध्यादेशास खीळ बसली होती. आता जवळ्याच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने वाटरबेल ही संकल्पना वास्तवात आणली आहे. जागतिक जल दिनापासून या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला आहे. यासाठी मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, विषयशिक्षक संतोष अंबुलगेकर, सहशिक्षक संतोष घटकार हे मार्गदर्शन करीत असून यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे, सरपंच कमलताई शिखरे, साहेबराव शिखरे, माजी सरपंच कैलास गोडबोले, आनंद गोडबोले, हरिदास पांचाळ, हैदर शेख, मनिषा गच्चे, मारोती चक्रधर आदींची उपस्थिती होती.

उन्हाळ्यात तापमान वाढत असतांना शरीरातील पाण्याची कमतरता हे अनेक आजारांचे कारण बनते. अनेक विद्यार्थी पाण्याची बाटली तशीच परत आणत असल्याचे निदर्शनास आले आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे थकवा येणे, मुतखडा, चिडचिडेपणा वाढणे आदी त्रास होण्याची शक्यता असते. बरेचदा विद्यार्थी खेळण्याच्या नादात पाणी पिण्याचेच विसरून जातात. त्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी शाळेत तीन वेळा वॉटर बेल वाजविली जात आहे.

शाळेच्या वेळापत्रकात तीनवेळा वॉटर बेल वाजविण्याबाबत मुख्याध्यापक ढवळे यांनी वेळ निश्चित केली आहे. पुढील काळात विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची सवय लागेल. या वेळेत विद्यार्थ्यांना स्वच्छतागृह वापरण्याची मुभा देण्यात येत आहे. जवळ्यात पाणी पिण्याचे महत्व जाणून वॉटर बेल उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सर्व विद्यार्थी शाळेच्या वेळेत नियोजनाप्रमाणे तीन वेळा पाणी पित आहेत. त्यासाठी ग्राम पंचायतीकडून शाळेत पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

सर्वप्रथम ही संकल्पना वास्तवात आणण्यासाठी शाळेतील शिक्षकांशी चर्चा केली. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आपल्यासमोर विद्यार्थी भरपूर पाणी पितील आणि पाण्याअभावी होणारे रोग कमी होतील या उद्देशाने सर्वांनी होकार दिला. त्यानुसार सकाळी १० वाजता पहिली घंटा वाजते तेव्हा सर्व विद्यार्थी प्रांगणात जमतात आणि पाणी पितात. असेच सकाळी ११.३० वा आणि शाळा सुटण्याच्या सुमारास दु. १.३० वा तिसऱ्यांदा पाणी पितात. या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत विद्यार्थी आनंद घेत आहेत. – मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, जि.प.प्रा.शा. जवळा दे.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!