
५७ जणांनी पाणीपुरी खाल्यामुळे मळमळ व उलट्या ….!! पाणीपुरी खाल्यामुळे विषबाधा सर्वांवर उपचार सुरू -NNL

अर्धापुर, निळकंठ मदने। तालुक्यातील मौजे चांभरा येथे ५७ जणांना विषबाधा झाली आहे .त्यांच्या चांभरा ,अर्धापुर व नांदेड येथे उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
दि .१४ एप्रिल रोजी चांभरा गावातील गावकऱ्यांनी पाणी पुरी खाली होती .परंतु १५ एप्रिल रोजी सकाळी मळमळ व उलट्या होण्यास सुरुवात झाली तर काही जणांना उलट्या व संडास सुरू झाल्याने गावकरी घाबरून गेले. त्यांच्यावर चांभरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू मात्र काहीं जणांना उलट्या व संडासचे प्रमाण वाढल्याने त्यांना अर्धापुर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले .तर दोघांना नांदेड येथील खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले .
पाणीपुरी विक्रीत्याकडून अनेकांनी पाणीपुरी खाल्यामुळे विषबाधा झालेल्याची संख्या मोठी आहे .यांत लहान मुलांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे .आज सकाळी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी चांभरा येथे येऊन पाहणी केली आहे तसेच पाणीपुरी विकणार्या व्यक्तीकडून पाणी पुरीचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे .
जिल्हा साथरोग अधिकारी डॉक्टर रुईकर ,तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय मुरमुरे ,वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण शिंदे ,डॉ .संदेश कदम ,डॉ .जनार्धन टारफे ,डॉ .मुस्तपूरे ,आरोग्य सेविका टरके ,कल्याने ,करकले ,सतिष जाधव ,कदम ,चिंचोलकर ,मूरली रामावत या पथकांनी गावातील सर्व विषबाधित रुग्णांची तपासणी केली आहे .तसेच पाणीपुरीचे सॅम्पल तपासणी करिता पाठवण्यात आले आहे . तसेच संपूर्ण गावात घरोघरी जाऊन तपासणी केली आहे .
चांभरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात -४७, अर्धापुर ग्रामीण रुग्णालयात – ८, नांदेड येथे खाजगी रुग्णालयात – २ उपचार सुरू आहे . यामध्ये ११ लहान मुले आहेत तर ४६ मोठ्या व्यक्तीचा समावेश आहे यात महिला व पुरुष आहेत.