नांदेड| गेल्या काही दिवसापासून उन्हाचा पारा वाढत असून, नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होत आहे. भोकर तालुक्यातील रावणगाव येथील शेतकरी भगवान विठ्ठलराव कदम (४२) यांचा १९ एप्रिल रोजी उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली.
भोकर तालुक्यातील रावणगाव येथील शेतकरी भगवान विठ्ठलराव कदम हे १८ एप्रिल रोजी घराच्या बांधकामासाठी लाकडे तोडण्यासाठी शेताकडे गेले होते. दिवसभर उन्हामध्ये इतरही काम त्यांनी केले. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने त्यांना रात्री त्रासही जाणवू लागला. १९ एप्रिल रोजी सकाळी शेताकडे जाऊन ११ वाजताच्या दरम्यान परत येत असताना ते झाडाखाली बसले व पाणी पिताच त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. उष्माघाताने मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.