
नांदेड। तालुक्यातील सोमेश्वर व परिसरातील भागात दुपारी एकच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह अर्धा तास गारपीट झाली. या परिसरात शेतकरी आपली जनावरे शेळी बैल म्हैस जनावरांना गारपिटीचा मार खावा लागला.


अचानक वादळी वारा व गारपीट झाल्यामुळे या परिसरात गरिबांच्या घरावरील पत्रावर मोठमोठी छिद्र पडली आहेत. तसेच शेतातील ऊस केळी या भागातील अतोनात नुकसान झाले आहे. या भागातील महसूल यंत्रणेने तात्काळ दखल घेऊन या परिसरात झालेल्या जनावरे शेती या पिकांचा व घरावरील पत्रांचा तात्काळ सर्वे करावा. अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. आज झालेल्या गारपिटीने या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

