Tuesday, June 6, 2023
Home कंधार पाणी पुरठ्यासाठी ग्रामपंचायत अभियंत्याच्या दालनात -NNL

पाणी पुरठ्यासाठी ग्रामपंचायत अभियंत्याच्या दालनात -NNL

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या दालनासमोर सरपंच प्रतिनिधी व ग्रामस्थासह आमरण उपोषण प्रारंभ

by nandednewslive
0 comment

नांदेड। जिल्ह्यातील निजामकालीन प्रार्श्वभूमी असलेल्या कंधार तालुक्यातील मौजे पेठवडज ता.कंधार येथील जल जीवन मिशन अंतर्गत सुधारित अंदाजपत्रक तयार करुन मिळावे यासाठी चक्क महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या दालनासमोर सरपंच प्रतिनिधी व ग्रामस्थासह आमरण उपोषण प्रारंभ झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शासनाच्या मार्गदर्शक सूचना व नियमानुसार लोकसंख्या जणगननेनुसार साठवण टाक्यांची क्षमता निश्चीत केल्याचे सांगण्यात येते. परंतु सन 2021 ची लोकसंख्येची अद्याप ही जणगणना झाली नसुन आकडेवारी हि उपलब्ध नाही. यामुळे सन 2022 मधील एप्रिलमध्ये अंगणवाडी कर्मचारी यांच्याकडून नोंदवलेली लोकसंख्या वस्तीनिहाय विचारात घेऊन त्या प्रभागात 55 लिटर दरडोई / दरदिवशी शुद्ध पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे.

वस्ती निहाय एप्रिल 2022 मध्ये नोंदवलेली त्यात पुनर्वसन वस्ती,साठे नगर,गाडगेबाबा नगर,आनंद नगर,पेठवडज वस्ती वाढ इंदिरानगर ते ग्रामपंचायत कार्यालय व मुळ पेठवडज गाव वस्ती या भागातील पाणी पुरवठ्याच्या अनूषंगाने ग्रामपंचायत कार्यालय पेठवडजच्या मासिक बैठकीमध्ये मा. उपभियंता जीवन प्राधिकरण यांना निमंत्रित करून त्यांच्या निदर्शनास आणून दिले कि सदरील अंदाजपत्रकात गावासाठी चालू असलेल्या प्राधिकरण मागील पाणीपुरवठा योजनेतील विहीर, पाईपलाईन हि सध्या स्थितीतच अपुरी असुन भविष्यात पाणीपुरवठा कामी हा मंजूर निधी अपूरा पडतो.

पेठवडज हे गाव विकसनशील वस्तीचे गाव असुन जुन्या बाजारपेठेचे गाव आहे. दररोज या गावातील सभोतालीन 15 ते 20 गावांच्या लोकांचा संपर्क असतो. गावात दोन बॅका जिल्हा परिषद हायस्कूल 4 प्राथमिक शाळा खाजगी 4 प्राथमिक शाळा एक कनिष्ठ महाविद्यालय एक महाविद्यालय असुन दररोज हजारो लोक बाजारपेठेत इतर कामासाठी ये जा करतात. भविष्यात पेठवडज हे गांव नगरपालिका व तालुक्याचे ठिकाण होणार आहे.

यामुळे विनंती कि पुनर्वसन वस्तीसाठी एक स्वतंत्र उद्देशाने गावातील विहीर पेठवडज प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात घेण्यात यावी. तसेच नव्या योजनेत घेण्यात आलेल्या अस्तित्वातील उदभव विहिरीस खोल करणे. जलाशयातुन आवश्यक तेवढे पाणी उचलण्यासाठी तांत्रिक दृष्टीने कोणती कामे करणे आवश्यक आहेत या बाबींचा विचार करून जुनी उदभव विहीर विकसीत करावी. तसेच प्रत्येक वस्तीमध्ये नव्याने पाईप लाईन पूर्णतः टाकण्यात यावी या पूर्वी केलेले अंदाज हे चुकीचे असून भविष्यात पाणी टंचाई भासणारी आहे तरी वरील वस्तीनिहाय सुधारित अंदाजपत्रक तयार न करून द्यावी या मागणीसाठी आमरण उपोषणास बसले असून तात्काळ दोन तासात लेखी आश्वासन दिल्याने सदरील उपोषण मागे घेण्यात आले.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!