Friday, June 9, 2023
Home उमरखेड कारखान्याच्या माध्यामातून शेतकऱ्यांच्या जिवनात आर्थिक थैर्य निर्माण होणार – खा. हेमंत पाटील, वसंतच्या ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्यास प्रतिसाद -NNL

कारखान्याच्या माध्यामातून शेतकऱ्यांच्या जिवनात आर्थिक थैर्य निर्माण होणार – खा. हेमंत पाटील, वसंतच्या ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्यास प्रतिसाद -NNL

by nandednewslive
0 comment

हदगाव/उमरखेड, शे चांदपाशा। खासदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी परिवाराच्या माध्यमातून मागील सात वर्षापासून बंद असलेला वसंत सहकारी साखर कारखाना घेण्यात आला. विक्रमी वेळेत हा कारखाना शेतकऱ्यांच्या सेवेत सुरु करण्यात आला. इतकेच नव्हे तर, स्वतःला साखर सम्राट म्हणून घेणाऱ्या कारखानदारांपेक्षा वसंत सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेततकऱ्यांच्या ऊसाला सर्वाधिक २५०० इतका हमी दर देण्यात आला आणि म्हणूनच याच वसंत सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जिवनात आर्थिक थैर्य निर्माण होईल असा खासदार हेमंत पाटील यांनी येथे विश्वास व्यक्त केला.

हदगाव येथील कस्तूरी मंगल कार्यालयात शनिवारी (दि.१३) ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, आपल्या भागात १६००० कोटी रुपये खर्चन ७ बंधारे बांधण्यात येणार आहेत. सोबतच १६ पुलांच्या माध्यमातून विदर्भ आणि मराठवाड्यातील हदगाव, हिमायतनगर, किनवट, माहूर, उमरखेड, कळमनुरी या सहा तालुक्यातील ७५००० हजार हेक्टर शेती पाण्याखाली येणार असून, बाजारपेठ एकमेकांशी जोडले जातील, शेतकऱ्यांना नेहमी छळणारा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. आजही अनेक शेतकऱ्यांचे पांदन रस्त्याचे प्रश्न, लाईट, नादुरुस्त डीपी असे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यावर लवकरच संबंधित अधिकारी यांची बैठक घेऊन कायमचा तोडगा काढला जाईल असे ते म्हणाले.

गेल्या अनेक वर्षापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हक्काचा हमी भाव मिळाला नाही. परंतु पहिल्यांदाच मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना वसंत कारखान्याने शेतकऱ्यांच्या ऊसाला २५०० रुपयाचा हमी भाव दिला. खासगी कारखानदारांच्या मक्तेदारीला चाप बसवण्यात आला असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी ऊस उत्पादक तज्ज्ञ शेतकरी सुरेश कबाडे यांनी ऊसाचा एक डोळा कटिंग करण्याची पद्धत, आकाशाच्या दिशेने डोळा ठेवणं, लागवड करताना ज्या बाजूने सुर्यप्रकाश जास्त त्या बाजूने डोळा कसा असावा, लागवड केल्याच्या दुसऱ्या दिवशी तन नाशकाचा वापर करण्याची पद्धत, खतांचा दुसरा डोस, शेंडा कटिंग पद्धत, जेठा मोडणे, शुक्ष्म अन्न द्रव्ये मिश्रण, नांगरणी या विषयावर तर, हवामान अभ्यास पंजाब डक यांनी वातावरण बदलामुळे शेतीवर होणारी परिणाम या विषयावर एकतास अतिशय रंजक अशी माहिती दिली. जवळपास सकाळी ११ वाजल्यापासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत एकाच ठिकाणावर बसून शेतकरी हवामान आणि ऊस पिकावरील महत्वाचे मार्गदर्शन ऐकत होते.

यावेळी शिवसेना माजी जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोहळीकर, वसंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अजयराव देशमुख, सदाशिव पुंड, माजी जि. प.सदस्य संभाराव लांडगे, गोपालजी सारडा, माजी सभापती बालासाहेब कदम, माजी सभापती तुकाराम चव्हाण, युवासेना जिल्हा प्रमुख संदेश हडसणीकर, पांडुरंग मामा कदम, बबनराव माळोदे, संदीप पाटील तालंगकर, शिवाजी महाराज साप्तीकर, बाबुराव काळे, सुदर्शन पाटील, अभिनेता विनय देशमुख यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!