
हदगाव, शे.चांदपाशा| एकदा कढाईत खाद्यपदार्थ तळण्याकरिता घातलेल्या तेलाचा वारंवार वापर केल्याची बाब सर्वञ पाहवायास मिळत आहे. हा नागरिकाशी जीवघेणा खेळ असुन, या बाबतीत संबंधित अन्न व औषध प्रशासनाला माहीत असुनही सदर विभाग काहीच कारवाई केल्याचे किवा या बाबतीत कोणत्याही प्रकारची जनजागृति करतांना दिसुन येत नाही. नेमके ह्या विभागाचे अधिकारी कर्मचारी काय करतात..? असा संभ्रम जनतेच्या मणात उत्पन्न झालेले आहे.


हदगाव शहर व तालुक्यात संबंधित विभागा कडुन नियमित तपासणी होत नसल्याने व या बाबतीत नव्या नियमाची ‘जनजागृती ‘होत नसल्याचे चौकशीअंती दिसुन आलेल आहे. फेरीवाले, हाँटेल, रेस्टाँरेट हायवे रोडवरील धाबे, या मध्ये खाद्यपदार्थ तयार करित आसतांना तेलाचा मोठ्या प्रमाणात पुनर्वापर होतो. एकदा तळण्यासाठी घातलेले तेल वारंवार वापरणे शरीर करिता किती घातक आहे. आरोग्यच्या दृष्टीने किती हानिकारक आहे. या बाबतीत महाराष्ट्र शासनाने जळालेल्या तेलाचा वापरावर कडक निर्बंध आणलेले आहे. या बाबती संबंधित विभागाकडुन कोणत्याही प्रकाची जनजागृती केलेली दिसुन येत नाही.


‘भारतीय फूड सेफ्टी स्टाँडर्ड अथाँरिटीने केलेल्या सुचनेवरुन सदर निर्बध लागू केले असल्याची माहीती मिळाली असुन, तळलेल्या तेलाचा पुन्हा वापर नियमबाह् ठरतो. त्यानुसार संबंधित विभागाकडुन कारवाई अपेक्षित असतांना माञ सदर विभागाकडे मणुष्य बळ नसल्याच कारणे पुढे करण्यात येत आहे. या बाबतीची मोहीम अन्न प्रशासनाने राबवली नसल्याची माहीती असुन, हदगाव शहरात व तालुक्यात शेकडो हाँटेल रेस्टाँरेट व धाबे आहेत. तसेच हातगाड्यावर खाद्यपदार्थ तयार केले जातात. खाद्य तेलाचा पुनर्वापर केल्याने त्याचे सेवन केल्याने आरोग्य करिता किती घातक आहे. अतिशय हानीकारक असतांना या बाबतीत माञ नादेडच अन्न प्रशासन माञ गाढ झोपेत आसल्याच त्याच्या कार्यशैलीवरुन दिसुन येते.


या बाबतीत काही तज्ञ डाँक्टरांच्या मते तळण्यासाठी तेलाचा पुन्हा वापर करणे हे आरोग्यच्या दृष्टीने फार घातक असुन, एक किवा दोनदा वापरल्याने जळालेल्या तेलात ट्रान्सफँट (चरबी व घातक मेद मोठ्या प्रमाणात तयार होते. त्याचे सातत्याने सेवन केल्यास मुञपिडचा आजार व हृदयविकार होण्याचा धोका असतो असे सांगितले जाते आहे.
