नांदेड। दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. नांदेड या बँकेची स्थापना होवून 100 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे शताब्दी वर्ष कार्यक्रम दिनांक 29 मे 2023 रोजी ए.के. संभाजी मंगल कार्यालय, येथे रात्री 9.00 वाजता संपन्न झाला. तत्पुर्वी शताब्दी वर्षानिमीत्त आयोजीत कार्यक्रमाचे प्रसंगी बॅंकेच्या नांदेड शाखेचे ए.टी.एम. सेंटर, नाबार्डचे अर्थसहाय्यातुन प्राप्त दोन ए.टी.एम. व्हॅनचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा तसेच बॅंकेने नव्याने सुरु केलेल्या सोनेतारण योजनेचा शुभारंभ कार्यक्रमाचे उद्घाटक मा. आ. अशोकरावजी चव्हाण यांचे हस्ते सायंकाळी 5.00 वाजता बॅंकेच्या मुख्य कार्यालय इमारतीच्या प्रांगणात संपन्न झाला. सदर उद्घाटन, लोकापर्ण सोहळा प्रसंगी बॅकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी व बँकेचे अधिकारी / कर्मचारी व याप्रसंगी जिल्ह्यातील विविध संस्थांचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.
यानंतर बॅकेच्या शताब्दी वर्ष सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रम ए.के. संभाजी मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. कार्यकमाची सुरुवात मान्यवराचे हस्ते प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन करुन करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक मा. आ. अशोकरावजी चव्हाण व इतर पुढील प्रमाणेचे मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला. सभेचे अध्यक्ष तथा बॅंकेचे अध्यक्ष मा. श्री वसंतरावजी चव्हाण, बँकेचे उपाध्यक्ष मा. श्री हरिहरराव भोसीकर, श्री. डी. पी. सावंत, डॉ. माधवराव किन्हाळकर, आ. मोहनराव हंबर्डे, माजी खा. डॉ. व्यंकटेश काब्दे, मा. खा भास्कररावजी पाटील खतगांवकर, श्री अमर राजूरकर, श्री किशनराव राठोड, श्री. गंगाधरराव पटणे, श्री. गुरुनाथराव कुरुडे, डॉ. सुनिल कदम, श्री भगवानराव आलेगांवकर, जिल्हा विकास अधिकारी नाबार्ड श्री दिलीप दमय्यावार, जिल्हा विशेष लेखापरिक्षक श्री बैस ठाकूर, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे नांदेड व्यवस्थापक श्री अशोकराव शिंदे व इतर मान्यवर.
त्यानंतर कर्ज वसुलीच्या संदर्भात उत्कृष्ट काम करणा-या सहकारी संस्थेच्या चेअरमनचा, पगारदार पतसंस्थेचे चेअरमनचा व बॅंक कर्मचा-यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. त्यानंतर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय सा.कदम यांनी बॅकेच्या स्थापनेपासुन म्हणजे 1923 पासुन 2023 या 100 वर्षाचे कालावधीमध्ये बॅकेच्या आर्थिक परिस्थितीमध्ये झालेले चढउतार याची आकडेवारीसह सविस्तर माहिती सांगीतली. ज्यामध्ये सन 1960 मध्ये आर्थिक स्थिती पुढील प्रमाणे असल्याचे मांडण्यात आले. भागभांडवल रु.10.73 लाख राखीव निधी रु.1.89 लाख, ठेवी रु. 22.67 लाख बाहेरुन काढलेली कर्जे रु.37.52 लाख गुंतवणुक रु2.20 लाख कर्ज येणे रु.111.30 लाख, वार्षिक नफा रु.0.35 लाख अंकेक्षण वर्ग ‘ब’ अशा प्रकारची प्राथमिक स्वरुपात आर्थिक परिस्थितुन बँकेच्या रु.0.35 लाख अंकेक्षण वर्ग ‘ब’ अशा प्रकारची प्राथमिक स्वरुपात आर्थिक परिस्थितुन बँकेच्या जिल्हयातील वाटचालीस सुरुवात झाली.
सन 2007 मधील बँकेची आर्थिक स्थिती अंत्यत वाईट होती. ज्यामध्ये प्रामुख्याने एन.पी.ए. (अनुत्पादीत कर्जे) रु.562.70 कोटी एवढे होते ज्याचे एकुण कर्जाशी प्रमाण 88% एवढे होते, नक्तमुल्य (NET WORTH) उने 325.73 कोटी. संचित तोटा रु. 369.40 कोटी, CRAR (Capital to Risk Weighted Assets Ratio) उने 86.17% व चालु वर्षातील तोटा रु.28.10 कोटी अशी अंत्यत वाईट परिस्थिती होती. या परिस्थितीतुन बँकेस बाहेर काढण्यासाठी माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य के विलासरावजी देशमुख यांनी महाराष्ट्र शासनाकडुन सन 2007 मध्ये बँकेस रु.20 कोटी भागभांडवल व सन 2008 मध्ये रु.100 कोटी कर्ज मंजुर केले.
त्यानंतर नांदेड जिल्हयाचे भुमिपुत्र तथा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री आ.अशोकराव चव्हाण यांनी सन 2009 मध्ये रु.110 कोटीचे कर्जाचे अनुदानामध्ये रुपातंर करणे व रु.10 कोटी विनापरतफेडीचे भागभांडवलामध्ये रुपातंर करणेसाठी महाराष्ट्र शासनाकडून मंजुरी दिली ज्यामुळे बँक उने नक्तमुल्यातुन (Negative Networth) मधुन अधिक नक्त मुल्यामध्ये (positive Networth) आली. तेव्हापासून अडचणीमध्ये आलेल्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पुनश्च प्रगतीची घोडदौड सुरु झाली. बँकेने सन 2007 च्या अंत्यत अडचणीच्या परिस्थितीवर मा.अशोकरावजी चव्हाण माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी केलेल्या मदतीनंतर जिल्हयातील संस्थाकडील एन.पी.ए. (अनुत्पादीत कर्जे) वसुलीसाठी युध्क्षातळीवर मोहीम राबवुन बँकेची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रशासकीय व लोकनियुक्त संचालक मंडळाचे कालावधीमध्ये प्रयत्न करण्यात आले. त्याचे फलस्वरूप म्हणुन बँकेच्या आर्थिक परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रगती झालेली आहे.
मार्च 2023 अखेरची बँकेची आर्थिक स्थिती पुढीलप्रमाणे आहे. भागभांडवल रु.68.23 कोटी, मुक्त राखीव निधी रु.127.66 कोटी, ठेवी रु.761.12 कोटी गुंतवणुक रु438.57 कोटी, पीक कर्ज वाटप रु.401.85 कोटी, कर्ज येणे रु743.12 कोटी वसुली रु.75.46% संचित तोटा कमी होऊन रु.62.45 कोटी शिल्लक असुन एन पी ए (अनुत्पादीत कर्ज) रु.134.93 कोटी शिल्लक असुन त्याचे एकुण कर्जाशी प्रमाण 18.15% एवढे आहे. तर नेट एन.पी.ए. चे प्रमाण निरंक आहे. नक्तमुल्य अधिक 178.75 कोटी असुन CRAR चे प्रमाण आर्थिक 21.53% आहे व बँकेने नाबार्डने दिलेल्या अर्थसहाय्यातुन प्राप्त दोन ए.टी.एम. व्हॅन ग्रामीण भागातील जनतेच्या सेवेसाठी तयार असून त्याचे लोकार्पण मा. अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या हस्ते झाल्याचे सांगीतले. सोनेतारण कर्ज व ए.टी.एम. सेंटर याचे उद्घाटन झाल्याची माहिती सर्व उपस्थितांना दिली.
यानंतर बँकेचे उपाध्यक्ष मा. श्री हरिहरराव भोसीकर यांनीही बँकेच्या 100 वर्षाच्या इतिहासाबद्दल व बँक राबवत असलेल्या उपक्रमाबद्दल माहिती दिली. यानंतर बँकचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ संचालक मा. भास्कररावजी पाटील खतगांवकर यांनी त्रिस्तरीय संरचनेबद्दल माहिती देवून सेवा सहकारी संस्था जिल्हा बॅंकेसारख्या विकसीत झाल्या पाहीजे असे मत मांडले.
यावेळी सभेचे अध्यक्ष मा.श्री. वसंतरावजी चव्हाण यांनी मा.अशोकरावजी चव्हाण यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात बँकेला कर्जरुपाने मिळालेल्या रक्कमेचे अनुदानात रुपांतर केल्यामुळे बँकेला स्थैर्याचे दिवस पाहावयास मिळाले याबद्दल त्यांनी मा.अशोकरावजी चव्हाण यांचे आभार मानले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज बँकेत विविध योजना राबविण्यात येत आहेत तसेच त्यांच्या मार्गदर्शनामुळेच बँकेला या आर्थिक वर्षात 37 कोटी व मागील वर्षात रु. 12 कोटी नफा झाल्याचे व एन.पी.ए. मध्ये 60 कोटी रुपये नगदी वसुली होवून एन.पी.ए. चे प्रमाण 18% वर आल्याचे नमुद केले.
यानंतर सत्काराला उत्तर देत असतांना कार्यक्रमाचे उद्घाटक तथा सत्कारमुर्ती मा.अशोकरावजी चव्हाण यांनी गतशंभर वर्षातील कारकिर्तीबद्दल व बँकेस आलेल्या आर्थिक चढ-उताराबद्दल विवेचन करुन बॅकेच्या अडचणीच्या प्रसंगी तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख असतांना बॅकेस 100 कोटी रुपये कर्जरुपाने देणेसाठी केवळ मी सकारात्मक भूमीका मांडली आणि मुख्यमंत्रयाकडून कर्ज मंजूर करुन घेतले. त्यानंतर सदरील कर्ज मी मुख्यमंत्री असतांना अनुदानात रुपांतरीत करुन देण्यात आले अशी भूमीका विषद केली.
बॅकेने या स्पर्धेच्या युगात इतर खाजगी बँकेप्रमाणे अद्यावत सुविधा जनतेला तत्पर पुरवाव्यात व या स्पर्धेच्या युगात टिकून राहावे असे मत मांडले. शेतक-याकडील कर्जाची नगदी स्वरुपात वसुली झाल्यानंतर 7 दिवसाचे अंतराने त्यांना नवीन कर्जवाटप करण्याचे संदर्भात शासनाच्या परिपत्रकातील जाचक अटीबाबत शासनाने फेरविचार करावा जेणेकरुन शेतक-यांना पुन्हा सावकाराकडे जाण्याचे काम पडू नये असेही मत मांडले. तसेच भविष्यात शेतकरी भिमुक काम करुन बँकेस गतवैभव प्राप्त करुयात मी सदैव तुमच्या पाठीशी आहे अशी ग्वाही दिली. आभार प्रदर्शन बँकेचे संचालक मा. श्री. गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी केले व महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.