नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नांदेड जिल्हा शेजारील बोढार येथील सर्वात मोठी व धक्कादायक घटना दिनांक 2 जून रोजी अविश्वास बसण्या सारखी घटणा घडली दलित समाजातील अक्षय भालेराव यांच्या सोबत वाद घालून निघॄन पणे हत्या करणयात आली. गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. जंयती काढल्यामुळे मनात दैष बाळगत गावगुंडानी एकत्रित ऐऊन हत्याचा प्रकार घडवला. गावात जयंती का साजरी केली या उद्देशाने सनातनी विचारांच्या गावगुंडांनी अक्षयचा कट रचून निर्घृणपणे हत्या केली.
सातच्या सात आरोपीना अटक करत फाशीची शिक्षा द्यावी. जलदगती न्यायालयात खटला दाखल करावा व कुटूंबाच्या एका व्यक्तीस शासकीय नौकरीत समाविष्ट करावे व तात्काळ अर्थिक मदत करण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली आहे. या घटनेचा निषेध करत रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष धम्मदिप भद्रे कांडाळकर यांच्यासह घटनेचा तिव्र निषेध करत नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे याना निवेदन देऊन मारेकराना फाशी ची शिक्षा द्या अशी मागणी करण्यात आली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष धम्मदिप भद्रे कांडाळकर सह जेष्ठ पत्रकार प्रकाश हानमते, नगरसेवक प्रतिनिधि सुनिल सोनकांबळे, राजेंद्र कांबळे, गंगाधर कोत्तेवार, नितीन देगांवकर, भुषण काळेवार, शिवाजी हवेलीवर, नागेश भालके अविनाश गायकवाड अदिनी उपस्थित राहून घटनेचा निषेध करण्यात आला. तहसीलदार गजानन शिंदे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व्यापारी आघाडीच्या वतीने, भारतीय बौद्ध महासभा यांच्यावतीने, व राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.